मुंबई

हनुमान चालीसा पठण प्रकरण: राणा दाम्पत्य गैरहजर राहिल्याने न्यायालय कडाडले

Swapnil S

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राणा दाम्पत्याच्या गैरहजेरीमुळे मुंबई सत्र न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी न्यायालयाला हलक्यात घेऊ नका, अशी तंबी देताना राणा दाम्पत्याला ११ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले. गैरहजर राहिल्यास ‘नॉन बेलेबल वॉरंट’ जारी केले जाईल, असेही न्यायालयाने बजावले.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यांचा दोषमुक्ततेचा अर्ज न्यायालयाने फेटाळताना आरोप निश्चितीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राणा दाम्पत्याच्या वतीने न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी तसेच दोषमुक्तेचा अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला हायकोर्टात दाद मागण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला. यावेळी न्यायालयाने संताप व्यक्त केला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त