मुंबई

हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांना दिलासा कायम

मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली

नवशक्ती Web Desk

मुंबई : कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांना विशेष पीएमएलए न्यायालयाने ६ सप्टेंबरपर्यंत ईडीच्या कारवाईपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे सोमवारी गैरहजर असल्याने सुनावणी ६ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे, तोपर्यंत अटक व अन्य कारवाई करू नये, असे ईडीला दिलेले निर्देश कायम ठेवण्यात आले आहेत.

ईडीने कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध आर्थिक अफरातफरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली. या अनुषंगाने ईडीकडून निष्कारण अटक केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करत हसन मुश्रीफ यांचे मुलगे नाविद, आबिद आणि साजिद यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जांवर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी ४ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्‍चित केली होती. मात्र न्यायाधीश गैरहजर राहील्याने सुनावणी बुधवारीपर्यंत तहकूब ठेवण्यात आली.

मुंबईत मलेरिया, डेंग्यूचे थैमान! डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २८ तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ; आजारांमुळे पालिका प्रशासनाची धावपळ

सिंहगडमध्ये 'अल्पसंख्याकांना प्रवेशबंदी'चा फलक; वादग्रस्त फलक पोलिसांनी हटवला, तपास सुरू

उद्धव ठाकरे म्हणाले, थोडं थांबा..आपले चांगले दिवस येणार! नाशिक महापालिकेतील नगरसेवकांशी ‘मातोश्री’वर खलबते

बोरघाटातील दुसरी लाईन दुरुस्त; आजपासून डेक्कन क्वीन, इंटरसिटी धावणार

उंच पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन नको! परवानगी न देण्यासाठी हायकोर्टाला साकडे