मुंबई

मरणासन्न अवस्थेतील महिलेला हायकोर्टाचा दिलासा, सत्र न्यायालयाचा आदेश केला रद्द

लग्नानंतर केवळ वर्षभरात पतीपासून विभक्त झालेल्या आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या महिलेला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : लग्नानंतर केवळ वर्षभरात पतीपासून विभक्त झालेल्या आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या महिलेला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी कनिष्ट न्यायालयाने मंजूर केलेल्या १ लाख २० हजार पोटगीच्या रक्कमेवर शिक्कामोर्तब करताना पोटगीची रक्कम २५ हजार रुपयांपर्यंत कमी करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला.

भारतात २०१६ मध्ये विवाह झाल्यानंतर हे दाम्पत्य अमेरिकेत निघून गेले. मात्र लग्नानंतर काही दिवसातच पतीने छळ सुरू केला. त्यामुळे वर्षभरातच महिलेला विभक्त व्हावे लागले. दरम्यानच्या काळात प्रकृती बिघडून महिला मरणासन्न अवस्थेत गेली. पतीने दर महिन्याला दीड लाख रुपयांची पोटगी देण्याचे मान्य केले. मात्र ते आश्वासन पाळले नाही. त्यामुळे महिलेच्या वतीने तिच्या कुटुंबीयांनी न्यायालयीन लढा सुरू केला.

कनिष्ठ न्यायालयाने तिला दरमहा १ लाख २० हजार रुपयांची अंतरिम पोटगी मंजूर केली. त्या विरोधात पतीने सत्र न्यायालयात धाव घेत, पोटगीची रक्कम सत्र न्यायालयाने २५ हजारांनी कमी केली होती.

Mumbai : अखेर प्रतीक्षा संपली! मेट्रो लाईन २बी आणि ९चा शुभारंभ; दहिसर-काशीगाव मार्गावर सेवा सुरु, जाणून घ्या वेळापत्रक

ठाणेकरांना पाण्याची अजिबात चिंता नको! धरणात पुरेसा पाणीसाठा; महापालिकेची माहिती

हजारो कोटींची टेंडर्स मॅनेज, सर्वांचे कमिशनही 'फिक्स'; नाशिकमधील प्रस्तावित कुंभमेळा टेंडर्स बाबत लाचखोर अधिकाऱ्याचे धक्कादायक दावे 

एनसीईआरटी पाठ्यपुस्तक वाद; 'त्या' ३ तज्ज्ञांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Nashik : रिक्षावाल्यांनी केला लिंबू-मिरची त्याग; अंनिसच्या परिषदेचा सकारात्मक परिणाम