मुंबई

१७ दिवसांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत ४७ जणांना अटक

नवशक्ती Web Desk

मुंबई : गेल्या सतरा दिवसांत मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विविध युनिटने मुंबईने शहरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या ४७ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून आतापर्यंत ३ कोटी ८६ लाख ५९ हजार ४१० रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ड्रग्ज तस्कराविरोधातील ही कारवाई आगामी काळात अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. २६ एप्रिलपासून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज खरेदी विक्रीसह ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतले होते. ही कारवाई सुरू असताना पोलिसांनी सोळा गुन्ह्यांची नोंद केली होती. त्यातील चार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या सोळा गुन्ह्यांत पोलिसांनी २३ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ९.३ ग्रॅम कोकेन, १०८.१५ ग्रॅम चरस, ७८७.६१ ग्रॅम एमडी, २ किलो ४६२ गांजा असे विविध ड्रग्जचा साठा जप्त केला होता.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!