मुंबई

१७ दिवसांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत ४७ जणांना अटक

या आरोपींकडून आतापर्यंत ३ कोटी ८६ लाख ५९ हजार ४१० रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : गेल्या सतरा दिवसांत मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विविध युनिटने मुंबईने शहरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या ४७ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून आतापर्यंत ३ कोटी ८६ लाख ५९ हजार ४१० रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ड्रग्ज तस्कराविरोधातील ही कारवाई आगामी काळात अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. २६ एप्रिलपासून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज खरेदी विक्रीसह ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतले होते. ही कारवाई सुरू असताना पोलिसांनी सोळा गुन्ह्यांची नोंद केली होती. त्यातील चार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या सोळा गुन्ह्यांत पोलिसांनी २३ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ९.३ ग्रॅम कोकेन, १०८.१५ ग्रॅम चरस, ७८७.६१ ग्रॅम एमडी, २ किलो ४६२ गांजा असे विविध ड्रग्जचा साठा जप्त केला होता.

५० हजारांवरील व्याजावर TDS कपात; ज्येष्ठ नागरिकांसाठी १ लाखपर्यंत सवलत

Mumbai : 'मेट्रो वुमन' अश्विनी भिडे बनल्या पहिल्या महिला BMCआयुक्त; आज पदभार स्वीकारणार

"लोक एकमेकांवर पडत होते..." बिहारमध्ये शीतला मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; ८ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी; Video

'रेडी रेकनर' दरवाढ माफक राहणार?­ महागाई व जागतिक अनिश्चिततेचा परिणाम

Bigg Boss Marathi 6 : ‘घटस्फोटाचा मुद्दा काढत मर्यादा ओलांडल्या...राकेश-विशालच्या हाणामारीवर बापट कुटुंबीयांचा संताप; कारवाईची मागणी