मुंबई

बेजबाबदार चालकांना पुन्हा दणका;नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई होणार

नागरिकांचा प्रतिसाद पाहून प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेला हा निर्णय नियमित करण्याबाबतही पांडेंनी म्हटले होते.

प्रतिनिधी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नो पार्किंग आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्या टोईंग न करण्याचा निर्णय ५ मार्चला घेतला होता. संजय पांडे निवृत्त झाल्यानंतर आणि सत्तांतरानंतर मुंबईतील टोईंगबाबतचा हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना यापुढे खबरदारी घ्यावी लागणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेला हा निर्णय नियमित करण्याबाबतही पांडेंनी म्हटले होते. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला होता; मात्र आता हा निर्णय बदलल्याने मुंबईकरांना मोठा झटका बसला आहे.

मुंबईकरांना कायमच वाहतूककोंडीशी सामना करावा लागतो. पांडेंनी घेतलेल्या निर्णयानंतर अनेक वाहनचालक कसेही वाहने पार्क करत होते. आयुक्तांनी दिलेल्या मुभेचा काही जणांकडून गैरफायदा घेतला जात होता. बेजबाबदारपणे रस्त्याच्या मध्ये कशीही गाडी पार्क केल्याने वाहतूककोंडी होत होती.

त्यामुळे माजी पोलीस आयुक्तांचा निर्णय बदलण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता आम्ही पार्किंग कुठे करायचे, असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे काही प्रमाणात गैरसोय होईल; मात्र बेजबाबदारपणे पार्किंग करणाऱ्यांना या निर्णयामुळे धडा मिळेल, असे बोलले जात आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत