मुंबई

दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; मंत्रिमंडळात घेतले 'हे' निर्णय

नवशक्ती Web Desk

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एक मोठी घोषणा केली. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारनेही दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तसेच, बी. एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार असल्याचादेखील निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीमध्ये शेती पंपाना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येणार आहे. २०२५पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, पुनर्जीवित किंवा पुनरर्चित साखर कारखाना, सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार असून सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील अकृषि विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात येणार असून असे अनेक निर्णय यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस