पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर; मदत आणि पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय जारी 
मुंबई

पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर; मदत आणि पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय जारी

गेल्या महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघर तसेच वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्तांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघर तसेच वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्तांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती भांडी, कपडे, पशुधन यांच्या नुकसानीपोटी तसेच दुकानदार, टपरीधारक यांनाही मदत दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ जुलै रोजीच्या बैठकीत पालघर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदत घोषित केली. त्यानुसार पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबाला कपड्यांच्या नुकसानीसाठी १० हजार तसेच घरगुती भांडी आणि वस्तू यांच्या नुकसानीपोटी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या अथवा कच्च्या घरासाठी दीड लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर; १० टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत तूर्तास निर्णय नाही - अभिजीत बांगर

घाटकोपर हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द

मंत्री नितीन गडकरींच्या नागपुरातील घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पश्चिम महाराष्ट्रातील ९१५ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील; सातारा जिल्ह्यातील ३०६ गावांचा समावेश, केंद्र सरकारचा मसुदा जाहीर

Jalgoan : वर्षभरापूर्वी बांधलेला पाळधी-तरसोद बायपास पूल खचला; खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी