मुंबई

मांजाने पक्षी मरतात तेव्हा धर्म कुठे जातो? मनिषा कायंदे यांचा सवाल

कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

Swapnil S

मुंबई : कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. त्यानंतर जैन समाजाने आक्रमक भूमिका घेत दादर येथील कबुतरखान्याजवळ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कबुतरखाना परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गुजरातमध्ये पतंग महोत्सवात मांजाने पक्षी मरतात तेव्हा तुमचा धर्म कुठे जातो, असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विचारला.

जेव्हा गुजरातमध्ये पतंग महोत्सव होतो तेव्हा अनेक पक्षी मांजामुळे मरून पडतात. तेव्हा कोणाच्या भावना दुखावत नाहीत. त्यामुळे हा वैज्ञानिक विषय आहे. ज्यामध्ये कोणीही धार्मिक रंग आणू नये. हे लोक म्हणतात की आम्ही आता नोटाला मत देऊ आणि निवडणुकीत धडा शिकवू. तर असे जैन धर्मात कुठे काही सांगितले आहे का? तसेच, कबुतर फक्त दाणेच खातात का? तर असे नाही. ते अनेक किटक वगैरे पण खातात, याची माहिती त्यांनी प्राणी शास्त्रज्ञांकडून घ्यावी, असा टोला कायंदे यांनी लगावला.

थायलंडमध्ये भीषण दुर्घटना! धावत्या ट्रेनवर अचानक क्रेन कोसळल्याने किमान २२ ठार, ३० जखमी; आकडा वाढण्याची भीती

'संपूर्ण पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचाच'; लडाखच्या LG नी ठणकावले, शक्सगाम खोऱ्यावरील चीनचा दावा फेटाळला

अजित पवारांच्या 'डिझाईन बॉक्स'ची तपासणी! राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा; प्रचार संपल्यानंतर गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे खळबळ

ग्लॅमरचा पडदा, राजकीय अजेंडा हा मुलाखतींचा नवा 'पॅटर्न'; सेलिब्रिटींच्या मुलाखतींमधून मतदारांना भावनिक साद की राजकीय दिशाभूल..?

मुंबईसह राज्यातील २६-२७ मनपा आम्ही जिंकू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास