मेट्रो बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात किती तरतूद; पाहा तपशीलवार माहिती Free Pic
मुंबई

‘मेट्रो ३’ची धाव आता वरळीपर्यंत; मार्च अखेरपर्यंत ‘२-अ’ टप्पा सुरू होणार

कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या मुंबईतील पहिल्या भुयारी ‘मेट्रो-३’ मार्गिकेचा आरे ते बीकेसी पहिला टप्पा गतवर्षी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. या मेट्रोचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) हा ‘२-अ’ टप्पा मार्च महिन्याच्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Swapnil S

मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या मुंबईतील पहिल्या भुयारी ‘मेट्रो-३’ मार्गिकेचा आरे ते बीकेसी पहिला टप्पा गतवर्षी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. या मेट्रोचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) हा ‘२-अ’ टप्पा मार्च महिन्याच्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

‘मेट्रो-३’ प्रकल्पाचे एकूण ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर स्टेशनशी संबंधित ९८.९ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित आर्किटेक्चरल आणि सिस्टम इंस्टॉलेशन लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मार्गिकेचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी ‘एमएमआरसी’कडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना आरे ते वरळीपर्यंत ‘मेट्रो-३’ने प्रवास करता येणार आहे.

हा टप्पा सुरू झाल्यास मुंबई लोकलवर पडणारा ताण कमी होऊन प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान, ‘एमएमआरसी’ने ‘बीकेसी-कुलाबा’ टप्पा लवकरात लवकर पूर्ण करण्यावर सध्या लक्ष केंद्रित केले आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे ट्रम्प यांचे संकेत

GST त दिलासा; १२ टक्क्यांचा स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल