मुंबईतील १५ तलाव होणार पुनरुज्जीवित; राज्य सरकारचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त, BMC सल्लागाराची नियुक्ती करणार  
मुंबई

मुंबईतील १५ तलाव होणार पुनरुज्जीवित; राज्य सरकारचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त, BMC सल्लागाराची नियुक्ती करणार

मुंबईतील तलावांची दुरवस्था झाली असून पुसत चाललेली ओळख पुन्हा जिवंत करण्यात येणार आहे. हे तलाव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील तलावांची दुरवस्था झाली असून पुसत चाललेली ओळख पुन्हा जिवंत करण्यात येणार आहे. हे तलाव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे तलाव पुनरुज्जीवित करण्यासाठी मुंबई महापालिकेचा वातावरणीय बदल व पर्यावरण विभाग सल्लागाराची नियुक्ती करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत सुमारे १४० तलाव आहेत. मात्र कचऱ्याचा भार आणि तलावांमधील वनस्पती व जीवजंतूंच्या अस्वच्छ परिस्थितीमुळे तलावतील पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. तलावांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने, प्रस्तावित योजनेत तलावाच्या परिसरातील गाळ काढणे, स्वच्छता करणे तसेच संपूर्ण सुशोभीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

खासदार पियूष गोयल यांनी मुंबईतील दुरवस्था झालेल्या तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबईतील प्रथम १५ तलाव पुनरुज्जीवित केले जाणार आहेत. हे तलाव राज्य सरकारच्या अखत्यारितील असून त्यांच्या कामासाठी नुकतेच ना हरकत प्रमाणपत्र मुंबई महापालिकेला प्राप्त झाले आहे. आता सल्लागाराची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

हे तलाव होणार पुनर्जीवित

मालाड मालवणी, मनोरी, मढ, एरंगळ, दारवली भागातील १५ तलाव आहेत. यामध्ये पाथरेवाडी, अली, कमल, दारीवली, भाटी, हिरादेवी, वेनीला, भुजाले तलाव, करजाई देवी तलाव, खरताळे तलाव, सुमलई तलाव, गाव तलाव, पोसरी तलाव, हरबादेवी तलाव, शांताराम तलाव यांचा समावेश आहे. पुनर्जीवन करताना तलावातील दूषित पाणी काढताच आजूबाजूच्या परिसरातील वास्तव्य करणारे पशुपक्षी, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा विचारही केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मेट्रो-५च्या टेंडर, अलाइनमेंटला सुरुवात; उल्हासनगरच्या विकासाला मिळणार नवी दिशा

Mumbai : पुन्हा BEST चा अपघात! पवईत इलेक्ट्रिक बस दुभाजकावर आदळली; ७ प्रवासी जखमी, चालक म्हणाला- 'कारकडे लक्ष गेलं'

Palghar Rain Alert : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! डहाणू-तलासरीत पूरस्थिती, रेल्वे सेवा ठप्प

Lonavala Viral Video : ट्रेकिंगदरम्यान थोडक्यात बचावला तरुण; पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकसाठी घ्या 'ही' खबरदारी

Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल