मुंबई : सभागृहात सत्ताधारीविरुद्ध विरोधक सामना रंगत असून विरोधकांकडून बेशिस्त वर्तन होत असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या निदर्शनास आले आहे. सभागृहात बेशिस्त वर्तन केल्यास सभागृहातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून, दुसऱ्यांदा चूक केल्यास १५ दिवसासाठी निलंबन केले जाईल.
अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाने विरोधकांचा हल्ला बोथट करण्यासाठी वेगळी अस्त्रे बाहेर काढली आहेत. मुंबई महापालिकेचे सभागृह नव्याने अस्तित्वात आल्यापासून विरोधी पक्ष सभागृहाच्या बैठकीत सातत्याने सभात्यागाचे हत्यार उपसत असल्याने विरोधकांना लगाम घालण्यासाठी सत्ताधारी महायुतीने आता पालिका अधिनियमाचा आधार घेत विरोधकांवर पलटवार करण्याची रणनीती आखली आहे.