Mumbai : तंदूर बनविणाऱ्या ४१४ हॉटेल्सना BMC ची नोटीस प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : तंदूर बनविणाऱ्या ४१४ हॉटेल्सना BMC ची नोटीस

मुंबई : बेकरी, हॉटेल, उपहारगृहामध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. परिणामी, वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Swapnil S

मुंबई : बेकरी, हॉटेल, उपहारगृहामध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. परिणामी, वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पालिकेने तंदूर खाद्यपदार्थ बनविणाऱ्या ४१४ हॉटेल चालकाना नोटीस बजावली आहे. ही कारवाई जानेवारीपासून २८ फेब्रुवारी करण्यात आली, अशी माहिती मुंबई पालिकेच्या पर्यावरण विभागाच्यावतीने देण्यात आली.

दक्षिण मुंबई परिसरात तंदूर व्यवसायाची संख्या अधिक आहे. या ठिकाणी लाकूड, कोळसा आणि फर्निचर यांच्या माध्यमातून तंदूर पेटवले जाते. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हॉटेलांची तपासणी करून नोटीस बजावण्यात येत आहे. हॉटेलच्या हद्दीत तंदूरआधारित नॉन व्हेज, रोटी आदी पदार्थ केले जातात.

या विभागात बजावल्या सर्वाधिक नोटीस

मुंबईत एकूण १६ हजारांहून अधिक लहानमोठी हॉटेल आहेत. त्यापैकी ४१४ हॉटेलांना यासंदर्भात नोटिस बजावल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे, ६१ नोटिस महापालिकेच्या ई वॉर्डमधील भायखळ्यातील हॉटेलांना बजावण्यात आल्या आहेत. तर वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, लोअर परळ या जी दक्षिण वॉर्डमध्ये १०७ हॉटेलांना नोटिशी बजावल्या आहेत. तर कुर्ला विभागातील ६३, परळ, लालबाग या एफ दक्षिण वॉर्डमध्ये ४३ आणि सांताक्रूझ, खार, वांद्रे पूर्व या एच पूर्व वॉर्डमधील २६ हॉटेलांना नोटीस देण्यात आली आहे.

Ajit Pawar Death : दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नावेळी क्रॅश झाले विमान; पायलटचे अखेरचे शब्द...ओह शिट...ओह शिट

अजित दादांना उद्या अखेरचा निरोप! पार्थिवावर सकाळी ११ वाजता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यसंस्कार

मोठी बातमी! विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

"दिलदार मित्र गेला..." अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांनी व्यक्त केले दुःख; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा; आज शासकीय सुट्टी

उद्ध्वस्त...अजितदादांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंनी एकाच शब्दात व्यक्त केल्या भावना