Mumbai : डबेवाल्यांची नवी इनिंग, क्लाऊड किचन उभारणार; जुनी सेवा अडचणीत, काळानुसार बदलण्याचा निर्णय 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : डबेवाल्यांची नवी इनिंग, क्लाऊड किचन उभारणार; जुनी सेवा अडचणीत, काळानुसार बदलण्याचा निर्णय

काळानुसार बदलणे हा मुंबईकरांचा मंत्र आहे. मुंबईचे डबेवालेही त्याला अपवाद नाहीत. कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याचा व्यवसाय घटल्यानंतर या डबेवाल्यांनी क्लाऊड किचन सुरू करून गरमागरम जेवण पुरवण्याची योजना आखली आहे.

Swapnil S

मुंबई : काळानुसार बदलणे हा मुंबईकरांचा मंत्र आहे. मुंबईचे डबेवालेही त्याला अपवाद नाहीत. कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याचा व्यवसाय घटल्यानंतर या डबेवाल्यांनी क्लाऊड किचन सुरू करून गरमागरम जेवण पुरवण्याची योजना आखली आहे.

मुंबईचा 'डबेवाला' हा त्यांच्या अचूक व्यवस्थापन व वितरण पद्धतीमुळे प्रसिद्ध आहे. कोविड काळात कार्यालये बंद राहिल्यानंतर डबेवाल्यांची संख्या कमी झाली. या फटक्यातून हा व्यवसाय अजूनही सावरलेला नाही.

याबाबत मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंडे म्हणाले की, डबेवाल्यांची संख्या पूर्वीच्या ५,००० वरून आता ३,००० वर आली आहे. ही घसरण मोठी आहे. तरीही, सर्व काही संपलेले नाही. असोसिएशनने आता सोयीस्कर ठिकाणी 'क्लाऊड किचन' सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे, जिथून ग्राहकांना थेट गरम जेवण पुरवले जाईल.

डबेवाल्यांची अन्न वितरण प्रणाली १८९० मध्ये सुरू झाली. महादेव बच्चे या कल्पक माणसाने सुमारे १०० कामगारांना सोबत घेऊन अन्न वितरणाचा हा व्यवसाय सुरू केला. लोकल ट्रेन हा वाहतुकीचा त्यांचा मुख्य आधार होता. सायकलवर ५० किंवा त्याहून अधिक डबे लादायचे आणि ऊन-पाऊस असो वा वादळ, जेवण वेळेवर पोहोचवायचे.

हार्वर्ड विद्यापीठाने या डबेवाल्यांवर केस स्टडी केली. डबेवाल्यांची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली की, २००३ मध्ये मुंबई दौऱ्यादरम्यान प्रिन्स चार्ल्स यांनीही त्यांची भेट घेतली होती. प्रिन्सने त्यांच्या दोन नेत्यांना, रघुनाथ मेदगे आणि सोपान मरे यांना लंडनमध्ये कॅमिला पार्कर-बॉल्ससोबत झालेल्या आपल्या लग्नाचे आमंत्रण दिले होते.

व्यवसाय अजूनही भक्कम

अनेक दशकांमध्ये डबेवाले मुंबईचा अविभाज्य भाग बनले आहेत. फूड डिलिव्हरी अॅप्समुळे त्यांच्या व्यवसायाला धक्का लागलेला नाही. परंतु, बदललेली लोकसंख्या आणि 'वर्क फ्रॉम होम' संस्कृतीचा त्यांच्यावर नक्कीच परिणाम झाला आहे. अनेक कार्यालये आता दक्षिण मुंबईतून उपनगरांमध्ये स्थलांतरित झाली आहेत, जी बऱ्याच नोकरदारांच्या घरांच्या जवळ आहेत. तथापि, डबेवाले अजूनही हार मानण्याच्या मन स्थितीत नाहीत. गेली अनेक दशके ते मुंबईकरांना डबा पोहोचवत आले आहेत, तसेच ते यापुढेही अविरतपणे सेवा देत राहू इच्छितात.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "अत्यंत धक्कादायक, मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?"

खर्चात मोठी वाढ; मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ५.४ लाख कोटींची भर

मुंबई-गोवा महामार्गाला ग्रामस्थांकडून हिरवाईची भेट; तळेकांटे ग्रामस्थ लावणार दोन हजार झाडे

आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागाकडून पंढरपूरसाठी १६ जादा एसटी फेऱ्यांचे नियोजन

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा टीझर प्रदर्शित; अंकुश, कुशल, अभिजीत आणि संतोषच्या गँगचा चित्रपटगृहात होणार तुफान राडा