(संग्रहित छायाचित्र) Hp
मुंबई

निवडणूक निकालानंतर ‘ड्राय डे’ संपणार,आहार संघटनेची याचिका निकाली

लोकसभा निवडणूक निकाला दिवशी ४ जूनला ‘ड्राय डे’ जाहीर करण्याचा दिलेला आदेश मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी मागे घेतला आहे.

Swapnil S

मुंबई: लोकसभा निवडणूक निकाला दिवशी ४ जूनला ‘ड्राय डे’ जाहीर करण्याचा दिलेला आदेश मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी मागे घेतला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दारू दुकाने खुली करता येतील, असे स्पष्ट केले. यामुळे ‘ड्राय डे’ संदर्भात निर्माण झालेला गोंधळ संपला आहे. याची दखल घेत खंडपीठाने याचिका निकाली काढली.

लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरात दारू बंदीचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ४ जून रोजी निवडणूक निकालादिवशी संपूर्ण दिवस दारू बंदीचा आदेश जारी केला आहे. या निर्णयाविरोधात आहार संघटनेने उच्च न्यायालयात ॲड. वीणा थडाणी, ॲड. विशाल थडाणी यांच्या मार्फत आव्हान देत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्या. नितीन बोरकर आणि न्या. सोमसेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील ॲड. ज्योती चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेला आदेश मागे घेत ४ जून रोजी निवडणुकीचा निकालानंतर दारू विक्री करण्यास मुभा दिली. या बरोबरच मुंबई उपनगर, रायगड जिल्ह्यातही या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे