मुंबई

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

मुंबईत येत्या २२ सप्टेंबरपासून मुंबईत इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) पर्यंत जलद, स्वच्छ आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत येत्या २२ सप्टेंबरपासून मुंबईत इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) पर्यंत जलद, स्वच्छ आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

सध्या या मार्गावर लाकडी बोटी धावत असून प्रवासाला साधारण एक तासाहून अधिक वेळ लागतो आणि भाडे प्रति प्रवासी १०० रुपये आहे. मात्र, नवीन इलेक्ट्रिक बोटींमुळे प्रवासाचा वेळ ४० मिनिटांच्या आत कमी होणार आहे.

या प्रकल्पाबाबत माहिती देताना भारत फ्रेट ग्रुपचे (बीएफजी) मालक सोहेल कझानी यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात दोन बोटी सुरू करण्यात येतील. "यापैकी एक हायब्रिड बोट असून ती सौरऊर्जा, इलेक्ट्रिक बॅटरी आणि डिझेल बॅकअपवर चालेल, तर दुसरी पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल. दोन्ही बोटी एका तासाच्या आत चार्ज करता येतील," असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील टप्प्यात जनरेटर्स बसवल्यानंतर चार हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी सेवेत दाखल होणार आहेत.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. आणि बीएफजी यांच्या भागीदारीत बांधलेल्या या वॉटर टॅक्सीमध्ये आलिशान सोफा-सीट्स (२०), वातानुकूलन, अत्याधुनिक नेव्हिगेशन सिस्टम स्वच्छतागृह, आणि लक्झरी प्रवासासाठी खास डिझाइन केलेले इंटीरियर आहे. १० नॉटिकल मैल प्रतितास या वेगाने धावणाऱ्या या बोटींमध्ये २ x २५ किलोवॉट मोटर्स आणि ६० किलोवॉट पॉवरपॅक असून, एका चार्जवर सलग चार तास धावू शकतात.

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना