Mumbai Water Cut: मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात (संग्रहित छायाचित्र FPJ)
मुंबई

Mumbai Water Cut: मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात

मुंबईत शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते.

धरणातील पाणीसाठा आणि भातसा, अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर १७ ऑगस्टपर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकतो, इतका उपलब्ध आहे. मात्र, यंदा पाऊस कमी पडणार असल्याने भविष्यात पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

ठाणे, भिवंडीतही पाणीकपात

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्याठिकाणीही शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.

ठाण्यातील ४६ विहिरींचे पुनरुज्जीवन होणार; आर.ओ. प्लांटद्वारे नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार

Navi Mumbai : रॅपिडोच्या नावाखाली दुचाकी चोरणारा जेरबंद; ५ मोटारसायकलींसह २ मोबाईल जप्त करत ७ गुन्हे उघडकीस

Mumbai : पश्चिम रेल्वेवर आज रात्री मोठा ब्लॉक; धीम्या मार्गावर ११.३१ वाजता शेवटची लोकल

वाहनांना HSRP प्लेट बसविणे अनिवार्य; नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड

राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या खुल्या गटातील नियुक्तीला चाप; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय