Mumbai : मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या चार हजार एकर जमिनीवर अतिक्रमण (Photo-X/@ShelarAshish)
मुंबई

Mumbai : राज्य आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या चार हजार एकर जमिनीवर अतिक्रमण

मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या तब्बल ४,१९४ एकर जमिनीवर अतिक्रमण झाले असल्याचे सोमवारी समोर आले.

Swapnil S

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या तब्बल ४,१९४ एकर जमिनीवर अतिक्रमण झाले असल्याचे सोमवारी समोर आले. या जिल्ह्याचा एकूण विस्तार सुमारे ३६९ चौरस किलोमीटर (९१,१८१ एकर) आहे. उपनगर भागात राज्य सरकारच्या मालकीचे मोठे भूखंड आहेत, ज्यात आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी, गोरेगाव), तसेच मानखुर्द मधील मोठे भूखंड आणि मिठागरांच्या जमिनींचा समावेश आहे.

२०१६ च्या सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील सुमारे ४,१९४ एकर शासकीय जमीन अतिक्रमणाखाली आहे. या जमिनी राज्य सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, केंद्र सरकारच्या मालकीच्या आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीत अतिक्रमित जमिनींवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर, सुमारे १.७५ लाख पात्र झोपडीधारकांना मोफत घरे मिळण्याची अपेक्षा आहे. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रमुख पदही भूषवणाऱ्या शेलार यांनी अधिकाऱ्यांना पुढील अतिक्रमणे रोखण्याचे आणि पुनर्वसन योजनांमधील अडथळे दूर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Mumbai Rain : पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरांसाठी रेड अलर्ट; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

Thane : पाण्यात उतरलेल्या करंटमुळे १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांकडून निष्काळजीपणाचा आरोप

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

कर्ज बाजारपेठ दुप्पट; भारतातील बँकांचे कर्ज वितरण पाच वर्षात पोहोचले २५ अब्ज डॉलरवर

Navi Mumbai : ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; महिलेच्या मृत्यूप्रकरणी आयुक्तांची कारवाई