मुंबई

मुंबई टॅक्सीमन युनियनने दिली १ ऑगस्टला टॅक्सी संपाची हाक

युनियनने सरकारकडे भाड्यात १० रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच किमान भाडे २५ रुपयांवरून ३५ रुपये करण्याची मागणी केली

देवांग भागवत

सरकार भाडेवाढीबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ मुंबई टॅक्सीमन युनियनने १ ऑगस्ट रोजी टॅक्सी संपाची हाक दिली आहे. पण या संपामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. युनियनने सरकारकडे भाड्यात १० रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच किमान भाडे २५ रुपयांवरून ३५ रुपये करण्याची मागणी केली आहे.

मुंबई टॅक्सीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशात वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहन चालकांना रोज ३०० रुपयांचं नुकसान सहन करावं लागतं. अशात वाहतूक पोलिसही अनेकदा कारवाई करून पैसे उकळतात. यामुळे मुंबईतील काही ऑटोरिक्षा संघटनांनी असंही म्हटलं आहे की, ते ३१ जुलैपर्यंत सरकारच्या भाडेवाढीची वाट पाहतील, जर यावर विचार झाला नाही तर रिक्षाचाही संप असणार आहे. दरम्यान, ऑटो युनियन किमान भाड्यात ३ रुपये वाढीची अपेक्षा करत आहेत. म्हणजेच सरकारने किमान भाडे २१ रुपयांवरून २४ रुपये करावं अशी मागणी आहे. दरम्यान, एमएमआरटीए (मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी) या आठवड्यात ऑटोच्या भाड्यात वाढ करायची की नाही यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

"भाडे वाढवण्याची खूप गरज आहे. कारण २०२१ मध्ये शेवटच्या भाडे सुधारणानंतर सीएनजीचा दर ४८ रुपयांवरून ८० रुपयांपर्यंत वाढला आहे." सरकारला शिफारस करण्यात आली होती की मागील भाडे सुधारणेनंतर सीएनजी २५ % पेक्षा जास्त वाढल्यास, टॅक्सीचे भाडे त्वरित सुधारित केले जावे.

- एएल क्वाड्रोस, टॅक्सी युनियनचे नेते

Bihar Election Results 2025 Live Updates: राघोपूरमध्ये 'कांटे की टक्कर' सुरूच; तेजस्वी यादव पुन्हा पिछाडीवर

पत्नीला साडेतीन लाखांची भरपाई देण्याचे आदेश; आर्थिक स्थितीची चुकीची माहिती देणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका

Mumbai : आयुक्तांच्या OSD विरोधात शड्डू; मुंबई पालिका सहाय्यक आयुक्तांचे थेट आयुक्तांनाच पत्र

BMC : पालिका परिमंडळीय स्तरावर वारसाहक्क मंजुरी समिती; प्रलंबित प्रकरणे लवकर मार्गी लागणार

Delhi car blast: दहशतवाद्यांना बाबरीचा बदला घ्यायचा होता; देशभरात ३२ कारमध्ये स्फोट घडवण्याचा होता कट; तपासातून माहिती उघड