मुंबई

मुंबईत २८ मे रोजी १५ टक्के पाणीकपात; ठाणे-भिवंडीलाही बसणार फटका

मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या १३ तासांच्या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच ठाणे व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील...

Swapnil S

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याचे काम पालिकेच्या वतीने हाती घेतले जाणार आहे.

हे काम बुधवार, २८ मे रोजी सकाळी ९.४५ पासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत एकूण १३ तासांसाठी नियोजित आहे. त्यामुळे मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या १३ तासांच्या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच ठाणे व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांसदेखील ही १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.

वाहनचालकांच्या मराठी ज्ञानाची होणार तपासणी; आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

Navi Mumbai : 'तू माझा खरा पप्पा नाहीस!' चिमुकल्याच्या बोलण्याने सावत्र पित्याचे पित्त खवळले; चिमुरड्याची केली निर्घृण हत्या

पुण्यात मुलाचा अपघाती मृत्यू; खड्डयामुळे दुचाकीवरून पडून घडली दुर्घटना, Video

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचे १० नोव्हेंबरला प्रकाशन

Mumbai : विसर्जन स्थळी समुद्रात ‘सेफ्टी सिग्नल’; खोलवर जाणाऱ्या भाविकांना ओहोटी रेषा दर्शवणारी तरंगती चिन्हे