(संग्रहित छायाचित्र)
मुंबई

'एनसीएलटी'मध्ये याचिकेची नोंदणी होताच कर्जवसुलीला स्थगिती लागू; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बॅंकांकडून केल्या जाणाऱ्या कर्जवसुलीच्या प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयाने 'कपोळ ॲडव्हर्टायझिंग एजन्सी'च्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. 'एनसीएलटी'मध्ये याचिका नोंदणीकृत होताच कर्जवसुलीला स्थगिती लागू होते. याचिकेची नोंदणी झाल्याच्या क्षणापासून कर्जदाराला 'कायदेशीर संरक्षण' लागू होते...

Swapnil S

मुंबई : बॅंकांकडून केल्या जाणाऱ्या कर्जवसुलीच्या प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयाने 'कपोळ ॲडव्हर्टायझिंग एजन्सी'च्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. 'एनसीएलटी'मध्ये याचिका नोंदणीकृत होताच कर्जवसुलीला स्थगिती लागू होते. याचिकेची नोंदणी झाल्याच्या क्षणापासून कर्जदाराला 'कायदेशीर संरक्षण' लागू होते, असा निर्णय न्यायमूर्ती मनिष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने दिला. या निर्णयाने जाचक वसुली प्रक्रिया राबवणाऱ्या बॅंकांना चपराक बसली आहे.

'कपोळ ॲडव्हर्टायझिंग एजन्सी'ने दाखल केलेल्या याचिकेवर सविस्तर सुनावणी घेत न्यायमूर्ती पितळे यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. दिवाळखोरी आणि नादारी संहितेच्या कलम ९६ अंतर्गत याचिका नोंदणीकृत झाली की, त्या क्षणापासून कर्जदाराला 'कायदेशीर संरक्षण' लागू होते. अशा परिस्थितीत बँकांना वसुलीची कोणतीही पुढील कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले.

याचिकाकर्त्या एजन्सीतर्फे ॲड. अनिरुद्ध हरिआनी आणि बॅंकेतर्फे ॲड. आर. एल. मोटवानी यांनी बाजू मांडली.

पोलिसांच्या मते चेतन हाच सूत्रधार; 'सियाला केतनविरुद्ध भडकवले, शेवटचा धक्काही त्यानेच दिला'

राज्यात पावसाची तूर्त विश्रांती; जुलैपासून पुन्हा पडणार; हवामान खात्याचा अंदाज

अखेर अटक व राजीनामे! राम मंदिर अपहारप्रकरणी ८ अटकेत; चंपत राय यांचा राजीनामा

MPSC च्या पूर्वपरीक्षा आता संगणकावर; वर्षातून दोन ते तीन वेळा परीक्षा घेण्याची घोषणा

'सिंदूर'मधील ६ शहिदांची नावे प्रथमच जाहीर