मुंबई

तीन हजार सोसायट्यांना पालिकेच्या उद्यान विभागाकडून नोटिसा

प्रतिनिधी

पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी उपायोजनांवर भर दिला जात असतानाच, वारंवार आवाहन करूनदेखील अनेक सोसायट्या वृक्षछाटणी करत नसल्याचे समोर आले आहे. अशा तीन हजार सोसायट्यांना पालिकेच्या उद्यान विभागाकडून नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

दरवर्षी पावसाळ्यात झाडे कोसळतात आणि झाडांच्या फांद्या पडून अपघात होतात. पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी अशी झाडे असलेल्या सोसायट्यांना नोटिसा दिल्या जातात; मात्र ज्या सोसायट्या वृक्षछाटणी करत नाहीत, अशा ठिकाणी फांद्या कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे यंदा पालिकेच्या उद्यान विभागाकडून वारंवार अशा सोसायट्यांना वृक्षछाटणीचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र तरीदेखील आजतागायत ६० टक्के सोसायट्यांनी पालिकेच्या उद्यान विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत वृक्षछाटणी करून घेतली. त्यामुळे उर्वरित प्रतिसाद न दिलेल्या तीन हजार सोसायट्यांना उद्यान विभागाने नोटीस बजावली आहे. तसेच सोसायट्यांमधील वृक्ष किंवा फांदी कोसळून दुखापत झाल्यास त्या सोसायटीला जबाबदार धरले जाईल, असे परदेशी यांनी सांगितले.

Dharmendra Death: बॉलिवूडचा 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे निधन, सनी देओलकडून मुखाग्नी; मनोरंजन विश्वात शोककळा

CJI Surya Kant Oath : न्या. सूर्य कांत बनले भारताचे ५३ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली शपथ; ७ देशांचे मुख्य न्यायाधीश हजर

पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचून धक्का बसला : अंजली दमानिया; गौरी गर्जे प्रकरणात उपस्थित केले गंभीर सवाल

Ram Mandir Flag Hoisting: ध्वजारोहणासाठी अयोध्या नगरी सजली, कडक सुरक्षा तैनात; उद्या होणाऱ्या कार्यक्रमात मोबाईल बंदी

रायगडच्या दहा नगरपालिकांमध्ये ‘लेकी-सुनां’ची एन्ट्री, राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी जोरदार तयारी