मुंबई

गोखले पुलाची एक लेन आजपासून खुली; पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची माहिती

हा पूल चार लेनचा असून पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी पूर्व ते एसव्ही रोड अंधेरी पश्चिम असा जोडतो. तसेच तेली गल्लीला कनेक्टर आहे.

Swapnil S

मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक लेन वाहतुकीसाठी सोमवारी संध्याकाळपासून खुली करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिली. दरम्यान, मुंबई शहरचे पालक मंत्री दीपक केसरकर व उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता एक लेनचे उद्घाटन होणार असल्याचे समजते.

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्याने नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने अंधेरी पूर्व व पश्चिमेसह वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली. गोखले पुलाचे काम जलदगतीने करावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी लावून धरली. परंतु रेल्वे हद्दीतील पुलाचे काम कोण करणार, यावर वाद निर्माण झाला आणि मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लक्ष घालत, पश्चिम रेल्वे व मुंबई महापालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर पुलाचे काम पालिका करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर पालिकेने २ डिसेंबर २०२३ रोजी पहिला गर्डर लाँच केला. तसेच पुलाजवळील पोच रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे एप्रिल २०२३ मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र पुलासाठी लागणारे गर्डर पंजाब येथील अंबालामधील कंपनीत तयार करण्यास उशीर झाल्याने पुढील कामे रखडली.

हा पूल चार लेनचा असून पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी पूर्व ते एसव्ही रोड अंधेरी पश्चिम असा जोडतो. तसेच तेली गल्लीला कनेक्टर आहे. पुलाचा दुसरा भाग डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याने संपूर्ण पूल डिसेंबरनंतर वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

Ind Vs Pak Asia Cup : ''भारतासमोर खेळण्याशिवाय पर्याय नाही''; अखेर BCCI ने सांगितले कारण

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले; पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब