मुंबई

कारची रिक्षाला धडक लागून पादचाऱ्याचा मृत्यू

डॉक्टरांनी मृत घोषित केले

नवशक्ती Web Desk

मुंबई : गोरेगाव येथे कारचे नियंत्रण सुटल्याने कारने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात सुरेश पुजारी या पादचाऱ्याचा मृत्यू झाला तर रिक्षाचालक सुभाषचंद्र मुन्नीलाल यादव हा गंभीररीत्या जखमी झाला. याप्रकरणी कारचालक निलेश रामसेवक जैस्वाल याला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस, तर रिक्षाचालकाला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, याच गुन्ह्यांत नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात मंगळवारी २९ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता गोरेगाव येथील एसआरपीएफ ग्रुप क्रमांक आठजवळील सिग्नलजवळ झाला. सुभाषचंद्र हा रिक्षाचालक असून, २९ ऑगस्टला तो दहिसर येथून जोगेश्‍वरीच्या दिशेने जात होता. त्याचवेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने एका बेलोरो कारने त्याच्या रिक्षाला जोरात धडक दिली. त्यात रिक्षा दोन वेळा पलटी होऊन ब्रिजच्या खाली गेली. त्यानंतर या कारने एका पादचाऱ्याला धडक दिली होती. अपघातात सुभाषचंद्र यादवसह पादचारी असे दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे या दोघांनाही जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे या पादचाऱ्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली