मुंबई

घाटकोपरवासीयांना पावसाळी दिलासा; पालिका प्रशासनाने घेतला 'हा' निर्णय

घाटकोपर येथील पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जुन्या पर्जन्य जलवाहिनी बदलत नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : घाटकोपर येथील पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जुन्या पर्जन्य जलवाहिनी बदलत नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. घाटकोपर येथील ११ प्रभागातील पर्जन्य जलवाहिनी नव्याने टाकणे, बॉक्स ड्रेनेजचे काम, वाहिन्यांचे रुंदीकरण अशी कामे हाती घेण्यात येणार असून, यासाठी ३६ कोटी ८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

सांडपाणी वाहून नेण्यासाठी मुंबईत पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले आहे. परंतु पर्जन्य जलवाहिनी या ब्रिटिशकालीन असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. मुंबई घाणमुक्त करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती त्या बदलण्याचे काम पालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून घाटकोपर येथील ११ प्रभागातील पर्जन्य जलवाहिनी नव्याने टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

या प्रभागातील पर्जन्य जलवाहिन्यांचे पुनर्बांधकाम!

घाटकोपर प्रभाग क्रमांक १२५,१२६,१२७,१३०, १३१ व १३२ मधील पर्जन्य जलवाहिनी बदलणे, पुनर्बांधकाम व पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण अशी कामे हाती घेण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ३० लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा