संग्रहित छायाचित्र  
मुंबई

'सावली' बार पत्नीच्या नावावर ही वस्तुस्थिती; बारमालकाची जबाबदारी केवळ दारूपुरतीच सीमित – रामदास कदम

कांदिवलीमधील ज्या बारवर पोलिसांनी कारवाई केली तो बार आपल्या पत्नीच्या नावावर असल्याची स्पष्ट कबुली राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : कांदिवलीमधील ज्या बारवर पोलिसांनी कारवाई केली तो बार आपल्या पत्नीच्या नावावर असल्याची स्पष्ट कबुली राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली. आमचा तो बार गेल्या ३० वर्षांपासून एक शेट्टी नावाचा इसम चालवतो आहे. बार मालकाची जबाबदारी केवळ दारूसंदर्भात असते, मात्र, डान्स व इतर गोष्टींसंदर्भात मालकाला जबाबदार धरता येत नाही, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असून या डान्सबारवर आणि तेथील २२ बारबालांवर अलीकडेच पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी माहिती देत शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेत केल्याने खळबळ माजली होती.

रामदास कदम म्हणाले, अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि या अर्धवट वकिलाच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे चालतात, त्यामुळेच त्यांची अशी अवस्था झाली आहे. आमचा तो बार गेल्या ३० वर्षांपासून एक शेट्टी नावाचा इसम चालवतो आहे. त्या हॉटेल आणि बारचा परवाना माझ्या पत्नीच्या नावाने आहे ही वस्तुस्थिती आहे. तसेच तिच्या नावाने ऑर्केस्ट्राचा परवाना देखील आहे. मुलींचे, वेटरचे लायसन्स देखील आमच्याकडे आहे. परंतु, ते काही अनधिकृत नाही. तिथे अनधिकृतपणे डान्स चालत नाही. ...तर मालक जबाबदार नाही शिवसेनेचे (शिंदे) नेते म्हणाले, त्या बारमध्ये एक गोष्ट घडली की, एका ग्राहकाने तिथल्या मुलीवर पैसे उधळले होते. त्यानंतर पोलीस तिथे गेले. मला ती गोष्ट समजल्यानंतर मी तात्काळ ऑर्केस्ट्रा व मुलींचे लायसन्स पोलिसांना सुपूर्द केले आणि हॉटेल बंद केले. कारण अशा घाणेरड्या पैशांची मला आवश्यकता नाही. ते अर्धवट वकील पुरेशी माहिती देत नाहीत. त्यांना कायदा माहित नाही. बार मालकाची केवळ दारूबाबत जबाबदारी असते. मात्र, डान्स व इतर गोष्टींसंदर्भात मालकाला जबाबदार धरता येत नाही.

अब्रुनुकसानीचा दावा करणार डान्सबार व हॉटेल संदर्भातील कलमात म्हटले आहे की, करार करून एखाद्या इसमाला हॉटेल व बार चालवायला दिल्यानंतर तिथे घडणाऱ्या सर्व गोष्टींसाठी तो इसम जबाबदार असेल. मालक जबाबदार नसतो, असा नियम आहे. परंतु त्या अर्धवट वकिलांना या नियमाची माहितीच नाही. अनिल परब केवळ मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मी देखील आता वकिलांचा सल्ला घेऊन अनिल परब यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करता येतोय का, याची चाचपणी करत आहे, असेही रामदास कदम म्हणाले.

Navi Mumbai : "कित्येक रात्री झोपलेच नाही" म्हणत महिलेचा उद्रेक; रात्रीच्या वीजखंडितीने नागरिक त्रस्त, Video

Thane : महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे शिक्षकांची वानवा; २२२ तासिका तत्त्वावरील शिक्षकाचा भार

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागला; सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ, तुमच्या शहरातील दर किती?

Mumbai : नेस्को प्रकरणाची पुनरावृत्ती वरळीतील कॉन्सर्टमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरू

World Poha Day: नागपुरात ३ हजार किलो तर्री पोहा अन् मोफत वाटप चर्चेत; शेफ विष्णू मनोहरांच्या या डिशची खासियत काय?