मुंबई

सलमान खान गोळीबार प्रकरण : अनमोल बिश्नोईचा शरणागतीसाठी अर्ज; योग्य चौकशीची मागणी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेला गँगस्टर अनमोल बिश्नोई याने मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला असून योग्य चौकशी आणि न्यायाच्या हितासाठी या प्रकरणात शरणागती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Swapnil S

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेला गँगस्टर अनमोल बिश्नोई याने मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला असून योग्य चौकशी आणि न्यायाच्या हितासाठी या प्रकरणात शरणागती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ असलेल्या अनमोल बिश्नोईला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला अटक केली. १४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये तो वॉन्टेड आरोपी आहे. चालू खटल्याला सामोरे जाण्यासाठी आणि न्यायालयीन कामकाजात सहभागी होण्यासाठी मी स्वेच्छेने शरणागती पत्करण्यास तयार आहे, असे त्याने स्पष्ट केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी

Mumbai : नरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू; प्रकल्प १७ वर्षांनंतर पुनरुज्जीवित

Mumbai : दोन दिवसांत १६ हजार मॅनहोल्सची तपासणी

कारवाईचा बडगा, १२ अधिकारी तडकाफडकी निलंबित; नादुरुस्त एसटी बस १५ दिवस पडून, लाखोंचे नुकसान

आज-उद्या रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडात मुसळधार पावसाचा इशारा