मुंबई

यश ज्वेलरी कंपनीकडून स्टेट बॅकेत ४०५ केाटींचा घेाटाळा; मुख्य प्रवर्तकाचे मेाझांबिकला पलायन

नवशक्ती Web Desk

(सेामेंद्र शर्मा)

सरकारी बॅंकांना गंडा धालून विदेशात पळून जाणाऱ्या उद्येाजकांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. अंधेरी येथील यश ज्वेलरी प्रा. लि. कंपनीचे मुख्य प्रवर्तक आणि संचाल प्रमेाद गेायंका स्टेट बॅकेला ४०५.५८ केाटींना फसवणून आग्नेय आफ्रिकेतील मेाझांबिक देशात बेपत्ता झाले आहेत. सीबीआयने या प्रकरणी गुन्ह्याचा कट रचणे, फसवणूक करणे आणि गैरव्यवहार अशा कलमांखाली यश ज्वेलरी कंपनी आणि संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार सीबीआयने यश ज्वेलरी प्रा. लि. कंपनीचे मुख्य प्रवर्तक प्रमेाद गेायंका, आर ए टाटा, ए एल प्रभुदेसाई आणि अन्य अनेाळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांनी मिळून भारतीय स्टेट बॅकेची नरीमन पॅाइंट येथील शाखा आणि अलिकडेच स्टेट बॅकेत विलिन झालेली ई-स्टेट बॅंक ऑफ पटियाला या बॅकांच्या माध्यमातून हा घेाटाळा केला आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार १२ एप्रिल रेाजी प्रकाश भारती नावाच्या एसबीआयच्या उप महाव्यवस्थापकाने कर्ज घेतलेली कंपनी आणि तिचे संचालक तसेच अनेाळखी सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून बॅकेला फसवण्याचा कट रचल्याची तक्रार केली हेाती. त्यानंतर सीबीआयने पुढाकार घेउन फॅारेन्सिक ऑडीट करवून घेतले. त्यानुसार ३१.०३.२०११ ते ३१.०३.२०१४ या कालावधीतील व्यवहारांचे फॅारेन्सिक ऑडीट केल्यानंतर बॅकेला मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर करण्यात आलेल्या कर्जातून अपेक्षित संपत्ती खरेदी करण्यात आली नव्हती. उलट तेा पैसा अन्य कामासाठी पैसा वापरला गेल्याचे उघड झाले. कंपनीच्या संचालकांनी बेईमानी करुन बॅकेला ४०५.८५ केाटींना फसवले हे यातून स्पष्ट झाले कारण हे कर्ज बॅकेला अखेर बुडीत खाती जमा करावे लागले आहे.

दरम्यान यश ज्वेलरी कंपनीचे मुख्य प्रवर्तक प्रमेाद गेायंका यांच्या मुलाने ते हरवल्याची तक्रार २०१८ साली केली हेाती. तसेच वर्तमान पत्रांमध्ये छापली हेाती. सीबीआयने एफआयआर मध्ये गेायंका मापुटे मेाझांबिक येथून हरवले असल्याचे नमूद केले आहे. प्रमेाद गेायंकाचा भाउ विनेाद गेायंका याने यंदा फेब्रुवारी महिन्यात पेालीस कमिशनर विवेक फणसाळकर यांना फेान करुन आपल्या भावाचा शेाध लागला का याची चैाकशी केली हेाती.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम