मुंबई

सेन्सेक्स २८७ अंकांनी घसरला;आशियाई बाजारातील घसरणीचा मोठा परिणाम

सेन्सेक्स ५९४८९.०२ पर्यंत घसरला, तर ६००८१.२४ पर्यंत वधारला, तर निफ्टी ७४.४० अंकांनी घसरून १७६५६ वर बंद झाला.

प्रतिनिधी

गेल्या सात दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात सुरू असलेली तेजी मंगळवारी संपली. आशियाई बाजार नरम पडल्याने आणि युरोपियन बाजारातून संमिश्र स्वरूपाचे संकेत मिळाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८७.७० अंकांनी घसरून ५९५४३.९६ वर बंद झाला.

दिवसभरात सेन्सेक्स ५९४८९.०२ पर्यंत घसरला, तर ६००८१.२४ पर्यंत वधारला, तर निफ्टी ७४.४० अंकांनी घसरून १७६५६ वर बंद झाला.

नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, एशियन पेंट‌्स‌ आदींचे समभाग घसरले, तर टेक महिंद्रा, मारुती, लार्सन ॲँड टुब्रो, डॉ. रेड्डीज लॅब, एसबीआय, एनटीपीसी आदींचे समभाग वधारले.

आशियातील सेऊल, शांघाय व हाँगकाँग आदीचे बाजार घसरले, तर टोकियो बाजार वधारला. युरोपियन स्टॉक एक्स्चेंजमध्ये बाजार संमिश्र होते. तर अमेरिकेतील वॉल स्ट्रीट बाजार सोमवारी वधारला.

रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, जागतिक बाजारातून अजूनही स्पष्ट संदेश मिळत नाहीत. विविध क्षेत्रातील समभाग निवडीवर केंद्रीत करायला हवे. ते करताना जोखमी व्यवस्थापन करायला हवे.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणशले की, दैनंदिन उत्पादन बनवणाऱ्या कंपन्या व खासगी बँकांच्या समभागात घसरण झाली. युरोपियन मध्यवर्ती बँकेची बैठक लवकरच होणार आहे. यात पुन्हा व्याजदर वाढीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बाजाराचे पूर्ण लक्ष या बँकेच्या घोषणेवर लागले आहे.

दिवसभरात बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक ०.३५ टक्के घसरला, तर मिडकॅप ०.४५ टक्के वधारला. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव १.२७ टक्क्याने घसरून ते ९२.०८ डॉलर्स प्रति पिंप झाले. सोमवारी परदेशी वित्त गुंतवणूकदारांनी १५३.८९ कोटींचे समभाग विकले.

शेअर बाजार दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त बुधवारी बंद राहणार आहे.

Mumbai : 'जय हो' बंद होणार? ब्रिच कँडी रहिवाशांच्या तक्रारीनंतर 'मेलोडी रोड' बंद करण्याचा निर्णय

Mumbai-Pune Expressway : 'प्रत्येक विकेंडला हीच दशा'; लोणावळ्यात महामार्गावर भीषण कोंडी, प्रवाशांचा उद्रेक

Mumbai : मिठीतील गाळ उपशाला वेग! ४ एप्रिलपासून वेगाने होणार काम; ९ लाख मेट्रिक टन गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट

४८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील 'रत्न भांडार' उघडले; दागिन्यांच्या मोजमापास सुरुवात

राज्याचे तापमान वाढणार; उष्ण व दमट हवामान; विजांसह पावसाची शक्यता