मुंबई

सायन रेल्वे पूल २ वर्षे बंद राहणार, धारावीतील वाहतूककोंडीतून करावा लागणार प्रवास

१ ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत नवीन पूल उभारण्यात येणार आहे. यामुळे वाहनचालकांना धारावीतील पुलावरून प्रवास करावा लागणार आहे.

Swapnil S

मुंबई : सायन-वांद्रेला जोडणारा महत्त्वाचा सायन रेल्वे पूल १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी दोन वर्षांसाठी बंद करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत नवीन पूल उभारण्यात येणार आहे. यामुळे वाहनचालकांना धारावीतील पुलावरून प्रवास करावा लागणार आहे. यामुळे वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागेल.

गेल्या काही महिन्यांपासून सायन पूल पाडण्याचे काम सुरू आहे. दहावी, बारावी परीक्षेमुळे आणि लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी पूल तोडण्यास विरोध केल्याने पुलाचे तोडकाम लांबणीवर टाकले होते. आयआयटीच्या अभियंत्यांनी हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल दिल्याने या पुलावरील जड वाहनांना बंदी करण्यात आली. त्यामुळे सायन-वांद्रेकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. या पुलामुळे मध्य रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेला अडथळा निर्माण झाला आहे. या पुलाचे काम मध्य रेल्वे आणि महापालिका एकत्र करणार आहे.

या पुलावरील वाहतूक धारावीतील ९० फूट आणि ६० फुटी रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. यामुळे आधीच वाहतूककोंडी होणाऱ्या या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

वैद्यकीय प्रवेश निकालाचा घोळ न्यायालयात; सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश; सुनावणी आता १३ नोव्हेंबरला