मुंबई

मुंबईत वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशींना अटक

बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून ते सर्वजण भारतात पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे

Swapnil S

मुंबई : मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना स्थानिक पोलिसांनी अटक केली असून, त्यात एका महिलेचा समावेश आहे. अमीना उमर फारुख शेख, इम्रान आलम शेख, तमजीत शौकत मुल्ला, आलमीन जावेद सरदार, हसन नूरइस्लाम मोरल आणि सुकेराली खालेक मंडल अशी या चौघांची नावे असून, अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून ते सर्वजण भारतात पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वाडीबंदर, बीपीटी रोडवर काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती नागपाडा एटीएसला मिळाली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून अमीना शेख या ३६ वर्षांच्या महिलेस अटक केली. दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी आलमीन सरदार आणि हसन मोरल या दोघांना दिंडोशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने मालाड येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, जागृती बसस्टॉपजवळील मंसुरी स्टोअरसमोरून अटक केली. ते दोघेही बांगलादेशी नागरिक असून सध्या वसई येथे राहत होते. तिसऱ्या कारवाईत सहार पोलिसांनी सुकेराली मंडल याला अटक केली. अन्य दोन घटनेत तमजीत मुल्ला याला वर्सोवा तर इम्रानला दहिसर पोलिसांनी अटक केली.

Mumbai : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट PMO अधिकाऱ्यासह बंदुकधारी बॉडीगार्डला अटक, सुरक्षा यंत्रणा सतर्क

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू