मुंबई

कोकण रेल्वेवर उन्हाळी सुट्ट्यानिमित्त विशेष रेल्वेगाड्या

उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सीएसएमटी- करमळी-सीएसएमटी विशेष (साप्ताहिक), लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम विशेष (साप्ताहिक) गाडी चालविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ सीएसएमटी- करमळी-सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी चालविण्यात येईल. ही गाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता करमळीला येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०११५२ करमळी ते सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी करमळीवरून दुपारी १:१५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि स्थानकावर थांबेल.

तसेच गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११३० करमळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक) ११ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर शुक्रवारी करमळीवरून दुपारी २.३० वाजता सुटेल व पहाटे ४.०५ वाजता एलटीटीला पोहोचेल.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली