मुंबई

स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; मुंबईकरांच्या चिंतेत भर

कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा चढ-उतार पाहता सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाटेचा उद्रेक होणार, असे संकेत मिळत आहेत

प्रतिनिधी

पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांचा मुंबईला विळखा बसला आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत तर आठवडाभरात दुपटीने वाढ झाली असून मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ आरोग्य विभागासह मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा चढ-उतार पाहता सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाटेचा उद्रेक होणार, असे संकेत मिळत आहेत. चौथ्या लाटेचा फैलाव वेळीच रोखण्यासाठी मुंबई महापालिका उपाययोजना करत असताना आता साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांमध्ये स्वाईन फ्लूचा झपाट्याने फैलाव होत असून, आठवडाभरात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. १ ते ७ ऑगस्टदरम्यान स्वाईन फ्लूच्या ८० रुग्णांची नोंद झाली होती; मात्र ८ ते १४ ऑगस्ट या आठ दिवसांत स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत ४२ने वाढ झाली असून, रुग्णसंख्या १३८वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ मलेरियाचे ४१२, डेंग्यूचे ७३, लेप्टोचे २९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांचा धोका वाढला असून, योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन