मुंबई

ऐन दिवाळीत मुंबईकर घामाघूम! पारा ३५ ते ३६ अंशांवर; भाऊबीजपर्यंत उकाडा राहणार कायम

मुंबईत दिवाळीची धामधूम सुरू असताना मुंबईकर मात्र उकाड्याने हैराण झाले आहेत. कधी दमट हवामान, कधी आग ओकणारा सूर्य आणि पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत दिवाळीची धामधूम सुरू असताना मुंबईकर मात्र उकाड्याने हैराण झाले आहेत. कधी दमट हवामान, कधी आग ओकणारा सूर्य आणि पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती ३ नोव्हेंबर म्हणजेच भाऊबीजपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असताना मुंबईत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअसवर राहिला आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिकांचे हाल होत आहेत. बेस्ट बस आणि रेल्वेतून दुपारच्या वेळच्या प्रवासादरम्यान मुंबईकरांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. यावेळेत उकाड्याने प्रवासी हैराण होत आहेत. वाढलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक थंड पेयांचा आधार घेत आहेत.

फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता खालावण्याची भीती

एकीकडे दमट हवामानामुळे उष्णतेत वाढ झाली आहे. तसेच दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रविवारपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे समुद्र किनारी भागात दमट हवामान आणि उष्णतेत वाढ होणार आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दिवसांत तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. राज्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे. - सुष्मा नायर, हवामान विभाग, मुंबई

मुंबईत शेतीविषयक ॲॅग्रोटेक प्रदर्शन भरणार; महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे १३ ऑगस्टला आयोजन

Ulhasnagar : महापालिकेचे मुख्यालयच असुरक्षित; ‘त्या’ २८३ इमारतींचे भवितव्य धोकादायक इमारतीतूनच जाहीर

Thane : पालिकेच्या नऊ प्रभाग समिती सभापतींची निवड; आठ बिनविरोध, मुंब्र्यात राष्ट्रवादीची (शरद पवार) बाजी

चार उत्पादनांवरील अँटी डम्पिंग शुल्क वाढवले; भारताने जुलैमध्ये नव्या उत्पादनावर लागू केले

घोडबंदर किल्ल्यावर होणाऱ्या गैरप्रकारांवर कारवाईची मागणी