मुंबई

दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्यात येणार

कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा तक्रारींचा पाढा यापूर्वी सभागृह व स्थायी समितीत सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी वाचला

प्रतिनिधी

पाणीगळती व दूषित पाणी रोखण्यासाठी दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल २८ कोटी ८६ लाख १ हजार १०० रुपयांचा खर्च अपेक्षित असून, निविदा मागवण्यात आल्याचे जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा तक्रारींचा पाढा यापूर्वी सभागृह व स्थायी समितीत सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी वाचला आहे; मात्र आजही दूषित पाणी व गळती या समस्या ‘जैसे थे’ आहेत, तर पाणीगळतीमुळे दिवसाला ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. दूषित पाणी व पाणीगळती रोखण्यासाठी दरवर्षी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र मुंबईकरांची या त्रासातून सुटका होऊ शकलेली नाही. त्यात आता दक्षिण मुंबईतील कुलाबा, भायखळा, सेंडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर व मलबार हिल परिसरातील दूषित पाणी व गळती रोखण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. १८ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून, अनुभवी कंत्राटदाराला दोन वर्षांसाठी दूषित पाणी व पाणीगळती रोखण्याचे २८ कोटी ८६ लाखांचे कंत्राट देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव