मुंबई

दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्यात येणार

प्रतिनिधी

पाणीगळती व दूषित पाणी रोखण्यासाठी दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल २८ कोटी ८६ लाख १ हजार १०० रुपयांचा खर्च अपेक्षित असून, निविदा मागवण्यात आल्याचे जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा तक्रारींचा पाढा यापूर्वी सभागृह व स्थायी समितीत सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी वाचला आहे; मात्र आजही दूषित पाणी व गळती या समस्या ‘जैसे थे’ आहेत, तर पाणीगळतीमुळे दिवसाला ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. दूषित पाणी व पाणीगळती रोखण्यासाठी दरवर्षी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र मुंबईकरांची या त्रासातून सुटका होऊ शकलेली नाही. त्यात आता दक्षिण मुंबईतील कुलाबा, भायखळा, सेंडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर व मलबार हिल परिसरातील दूषित पाणी व गळती रोखण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. १८ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून, अनुभवी कंत्राटदाराला दोन वर्षांसाठी दूषित पाणी व पाणीगळती रोखण्याचे २८ कोटी ८६ लाखांचे कंत्राट देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम