मुंबई

सामान्य माणसाला ‘मत आहे, मात्र पत कुठे आहे?’ ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचा सवाल

वारांगणेची उपमा या सरकारला लागू पडते, असा संतप्त सवाल यावेळी अनेक कामगार नेत्यांनी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : सामान्य माणसाला ‘मत आहे, मात्र पत कुठे आहे?’ असा सवाल ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केला आहे. माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

कामगार नेते नरेंद्र पाटील, नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले व आदी माथाडी नेते यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय ‘माथाडी कायदा बचाव कृती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक ३४ मागे घेऊन माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक सरकारने करावी. ९४ वर्षीय कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना नीट उभे राहता येत नाही, तरीही ते या कामगारांच्या घामाला न्याय देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. माथाडी मंडळाचे अधिकार काढून व्यापारी वर्गाला खूश करण्यासाठी व माथाडी कामगाराला देशोधडीला लावण्याचा विडा या सरकारने उचलला आहे. वारांगणेची उपमा या सरकारला लागू पडते, असा संतप्त सवाल यावेळी अनेक कामगार नेत्यांनी व्यक्त केला.

मेन्टेनन्स योग्यच! प्रलंबित देखभाल शुल्क वसूल करण्याच्या सोसायटी निर्णयाला मान्यता

'इंडिगो'ला २२.२ कोटींचा दंड; DGCA ची कारवाई; कंपनीच्या व्यवस्थापनाला दिला कडक इशारा

एकाच बाईकवर 'विराट' आणि 'धोनी'! व्हायरल Video पाहून नेटकरी गोंधळले; कमेंट्समध्ये मजेशीर प्रतिक्रिया

दोन महिन्यांनंतर राजकुमार राव आणि पत्रलेखाने दाखवली लाडक्या लेकीची पहिली झलक, नावही केले जाहीर

Thane : स्वतंत्र लढलो असतो तर अधिक मते मिळाली असती; आमदार संजय केळकर यांचे मत