मुंबई

सामान्य माणसाला ‘मत आहे, मात्र पत कुठे आहे?’ ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचा सवाल

वारांगणेची उपमा या सरकारला लागू पडते, असा संतप्त सवाल यावेळी अनेक कामगार नेत्यांनी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : सामान्य माणसाला ‘मत आहे, मात्र पत कुठे आहे?’ असा सवाल ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केला आहे. माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

कामगार नेते नरेंद्र पाटील, नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले व आदी माथाडी नेते यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय ‘माथाडी कायदा बचाव कृती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक ३४ मागे घेऊन माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक सरकारने करावी. ९४ वर्षीय कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना नीट उभे राहता येत नाही, तरीही ते या कामगारांच्या घामाला न्याय देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. माथाडी मंडळाचे अधिकार काढून व्यापारी वर्गाला खूश करण्यासाठी व माथाडी कामगाराला देशोधडीला लावण्याचा विडा या सरकारने उचलला आहे. वारांगणेची उपमा या सरकारला लागू पडते, असा संतप्त सवाल यावेळी अनेक कामगार नेत्यांनी व्यक्त केला.

वर्गात मोबाईलला बंदी! जगातील निम्म्याहून अधिक देशांनी घेतला मोठा निर्णय; UNESCO अहवालातून उघड

मुंबईत वॉटर मेट्रो येणार? कल्याण-गेटवे ३४० किमी मार्ग; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता

Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर....

पाळीव मांजर ठेवण्यास कुटुंबीयांचा विरोध; २३ वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! हुंड्यासाठी पतीकडून पत्नीची हत्या; अवघ्या ४ महिन्यांत संसार उद्ध्वस्त