मुंबई

रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला ३०३०७ कोटी रुपयांचा लाभांश देणार

प्रतिनिधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला ३०३०७ कोटी रुपयांचा लाभांश देण्यावर शिक्कामोर्तब केले. बँकेच्या संचालक मंडळाने या निर्णयाला मान्यता दिली आहे.

२०२१-२२ रोजी ३०३०७ कोटी रुपये सरप्लस रक्कम सरकारला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली. आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ५९६ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येण्यात आली. या बैठकीत सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक व स्थानिक आव्हाने, भूराजकीय परिस्थितीचा परिणाम आदींवर चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षी मे मध्ये आरबीआयने जुलै २०२० ते मार्च २०२१ दरम्यान ९९१२२ कोटी रुपयांचा लाभांश दिला होता.

Mumbai : चेंबूर बस दुर्घटनेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Mumbai : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; काही विद्यार्थी जखमी, बचावकार्य सुरू, Video

आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट; WhatsApp चं नवं Username फीचर, जाणून घ्या डिटेल्स

सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल