मुंबई

रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला ३०३०७ कोटी रुपयांचा लाभांश देणार

प्रतिनिधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला ३०३०७ कोटी रुपयांचा लाभांश देण्यावर शिक्कामोर्तब केले. बँकेच्या संचालक मंडळाने या निर्णयाला मान्यता दिली आहे.

२०२१-२२ रोजी ३०३०७ कोटी रुपये सरप्लस रक्कम सरकारला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली. आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ५९६ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येण्यात आली. या बैठकीत सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक व स्थानिक आव्हाने, भूराजकीय परिस्थितीचा परिणाम आदींवर चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षी मे मध्ये आरबीआयने जुलै २०२० ते मार्च २०२१ दरम्यान ९९१२२ कोटी रुपयांचा लाभांश दिला होता.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन