File 
मुंबई

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शासकीय अधिकाऱ्यांची बदली

मुख्य आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी सचिवाच्या नावाने शासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढणाऱ्या एका कंत्राटदाराला गुन्हा दाखल होताच राज्य सायबर सेल पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इलियास याकूब मोमीन असे या ४० वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा सांगलीच्या मिरजचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बोगस ईमेल आयडी तयार करून ही फसवणूक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडवणीस यांच्या खासगी खचिवाच्या नावाने एक बोगस ईमेल आयडी बनविण्यात आले होते. त्यांच्या मेलवरून बोगस दस्तावेज सादर करून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागासह उर्जा विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. २३ जुलैला अज्ञात व्यक्तीने सरकारी अधिकाऱ्यांसह कर्मचारी, सहाय्यक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता पदाच्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले होते. हा मेल नंतर महावितरणाच्या सीएमडींना पाठविण्यात आला होता. अशाप्रकारे बदलीचे आदेश काढून अज्ञात व्यक्तीने त्यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केली होती. हा प्रकार खासगी सचिव असलेल्या विद्याधर महाले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.

या तकारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांनी ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० ब भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. सायबर सेल पोलिसांनी मिरज येथून मोहम्मद इलियास मोमीनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानेच बोगस मेल बनवून देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी सचिवाची बोगस स्वाक्षरी करून शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले होते. त्यानंतर त्याला अटक करुन पोलिसांनी पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते.

BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचे भारतात आगमन; ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक

लोकल चलन, ग्लोबल व्यापार! स्थानि‍क चलनात व्यापार करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी; भांडुप ते तुर्भे साडेतीन तास

हक्काच्या जमिनीसाठी बालमित्र असलेल्या पंतप्रधानांकडे वृद्धाची तक्रार; २८१० चौ.मी. जमिनीचा वाद, CBI चौकशीची मागणी

राज्यात १०० टक्के दुष्काळाचे सावट; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची चिंता