मुंबई

चरस विक्रीप्रकरणी मुंबईसह बिहारहून दोन आरोपींना अटक

बिहारच्या छपरा गावात राहणाऱ्या असगरअलीने त्याला हे चरस दिले होते

नवशक्ती Web Desk

मुंबई : बिहारहून चरस आणून त्याची मुंबईत विक्री करणाऱ्या एका टोळीचा एमएचबी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन आरोपींना मुंबईसह बिहार येथून पोलिसांनी अटक केली आहे. दीपक अक्षय बरनाथ सिंह आणि असगरअली अमन हुसैन अन्सारी अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी ५०० ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले. बोरिवली परिसरात काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एक्सर मेट्रो स्टेशनजवळील गॉसिप हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा लावून दीपक सिंह याला अटक केली. त्याच्याजवळ पोलिसांना ५०५ ग्रॅम वजनाचे चरस सापडले. त्याची किंमत ७ लाख ५७ हजार रुपये इतकी आहे. बिहारच्या छपरा गावात राहणाऱ्या असगरअलीने त्याला हे चरस दिले होते. ही माहिती प्राप्त होताच पथकाने बिहारहून असगरअली हुसैन याला अटक केली.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले