मुंबई

चोरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड दोन महिलांना अटक

दोघींनाही लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : चोरीच्या दोन गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या दोन महिला नोकरांना जुहू आणि एमएचबी पोलिसांनी अटक केली. मारिया राजू नाईक ऊर्फ मारिया कल्को आणि कालिंदा नाना कसबे अशी या दोघींची नावे आहेत. या दोघींकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कोठडीनंतर या दोघींनाही लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जुहू येथील अझारा अख्तर जयपुरी यांच्या नातवाच्या देखभालीसाठी मारिया नाईक हिला केअरटेकर म्हणून ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरातून साडेसात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. त्यांच्या घरी मारिया वगळता इतर कोणीही येत नव्हते. त्यामुळे तिनेच या दागिन्यांची चोरी केल्याचा संशय व्यक्त करून अझारा यांनी तिच्याविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती.

याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच मारियाला चार दिवसांपूर्वी गोरेगाव येथून पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या घटनेत एका घरी मोलमजुरी करताना मंगळसूत्र नेऊन पोबारा केल्याप्रकरणी कालिंदा कसबे या महिलेस एमएचबी पोलिसांनी अटक केली.

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन