Photo : X (PTI)
मुंबई

विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी चौघांना अटक

पालघर जिल्ह्यातील विरार येथे झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी, ज्यात या आठवड्याच्या सुरुवातीला १७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या आणखी चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

Swapnil S

पालघर : पालघर जिल्ह्यातील विरार येथे झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी, ज्यात या आठवड्याच्या सुरुवातीला १७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या आणखी चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

या दुर्घटनेच्या तपासाची जबाबदारी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

बेकायदेशीरपणे उभारलेली चार मजली रमाबाई अपार्टमेंट इमारत बुधवारी मध्यरात्री सुमारे १२.०५ वाजता विरारच्या विजय नगर भागात शेजारील रिकाम्या घरावर कोसळली. या घटनेत किमान १७जणांचा, त्यात दोन लहान मुलांचाही समावेश होता, मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले की, गुन्हे शाखेने त्या जागेच्या दोन महिला मालकांना आणि त्यांचे पती जे रहिवाशांकडून भाडे गोळा करत होते, त्यांना अटक केली आहे.

यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी, बांधकाम व्यावसायिक नीतल साने याला अटक केली होती.

या प्रकारे या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, दुर्घटनेत बाधित इमारतीतील रहिवाशांना तात्पुरते निवासस्थान म्हाडामार्फत उपलब्ध करून दिले जाईल.

सणासुदीत साखर कडू! दर ७० रुपये किलोवर, गूळही महागला; महिन्यात २० रुपयांनी वाढ, शेवया-बत्ताशांचे भावही वाढले

ठाणे-पालघरमध्ये करटुले खातेय भाव; चिकनपेक्षाही महाग, ऐन श्रावणात शाकाहारींच्या खिशाला कात्री

राज्यात महा सीएसआर प्राधिकरण स्थापणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

‘कॅस’ फेरफारप्रकरणी SEBI ची कठाेर कारवाई; शेअर बाजारातील दोन संस्थांचे ₹ ३.६८ कोटी जप्त, सेन्सेक्सच्या क्लोजिंग प्राइसमध्ये नफा कमवल्याचा आरोप

Mumbai : नि:क्षारीकरण प्रकल्पाला विरोध; मनोरीवासीयांचे जोरदार आंदोलन, स्थानिक मासेमारीला धोका निर्माण होण्याची भीती