मुंबई

पाणी गळती, टंचाई रोखणार ;जलवाहिन्यांचे जाळे विस्तारणार

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणीसाठा वर्षभर मुंबईकरांची तहान भागवेल इतका आहे; मात्र पाणी गळती व पाणी चोरीमुळे पाणी टंचाईचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. पाणी गळती रोखण्यासाठी मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील जल वाहिन्या बदलत नवीन जाळे विस्तारले जाणार आहे. त्यामुळे पाणी गळतीचा प्रश्न मार्गी लागेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो; मात्र यापैकी पाणी चोरी व गळतीमुळे ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते आणि मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. वडाळा, कुर्ला, मालाड, कुरार गाव, कांदिवली चारकोप, गोराई, बोरीवली भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याचे तेथील माजी नगरसेवकांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे. काही दिवसांपूर्वीच अंधेरी, विलेपार्ले परिसरातील नागरिकांनी पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन देखील केले होते. त्यानंतर पालिकेने अनेक भागात जल वाहिन्यांमधील तांत्रिक दोष दूर करण्याचे, जलाशयांच्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे काम सुरू केले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस