मुंबई

सायबर न्यायवैद्यक विभागातील पदे रिक्त का? वेळीच भरती का नाही केली? हायकोर्टाचा संताप; राज्य सरकारला धरले धारेवर

सायबर न्यायवैद्यक विभागातील तज्ज्ञ कर्मचार्‍यांची पदे भरण्यास टाळाटाळ करणार्‍या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले.

Swapnil S

मुंबई : सायबर न्यायवैद्यक विभागातील तज्ज्ञ कर्मचार्‍यांची पदे भरण्यास टाळाटाळ करणार्‍या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने राज्यात हजारो फौजदारी खटले प्रलंबित असताना सायबर न्यायवैद्यक विभागातील रिक्त पदे वेळीच का भरली जात नाहीत? असा संतप्त सवाल उपस्थित करत राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.

एड्युज कंपनीने चोरीस गेलेल्या डाटाचा तपास बांद्रे पोलीस ठाण्यातून अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग करा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयाला दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी सायबर न्यायवैद्यक विभागातील कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्येची बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच खंडपीठाने संताप व्यक्त करत राज्य सरकारच्या उदासीन कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. सायबर न्यायवैद्यक विभागातील पदे रिक्त का? ही पदे भरण्याची जबाबदारी कोणाची? कर्मचार्‍यांची रिक्त पदे असताना वेळीच भरती का केली नाही? रिक्त पदे कधी भरणार, आदी प्रश्नांचा भडीमार करत राज्य सरकारला याबाबत ८ ऑगस्टला सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश दिले.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव

Pune : पुण्यातील ससुन रुग्णालयातील संतापजनक प्रकार! उपचाराअभावी आदिवासी तरुणाचा तडफडून मृत्यू | Video