Karnataka : शिंपले गोळा करताना ११ जणांचा मृत्यू (Photo -X)
राष्ट्रीय

Karnataka : शिंपले गोळा करताना ११ जणांचा मृत्यू

उत्तर कन्नड जिल्ह्यातील 'तट्टे हक्कलू' नदीतील शिंपले किंवा कालवं गोळा करण्यासाठी गेलेल्या अकरा जणांचा बुडून मृत्यू झाला.

Swapnil S

कारवार : उत्तर कन्नड जिल्ह्यातील 'तट्टे हक्कलू' नदीतील शिंपले किंवा कालवं गोळा करण्यासाठी गेलेल्या अकरा जणांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने हे सर्व जण वाहून गेले व त्यांना वाचवणे अशक्य झाले. भटकळ तालुक्यातील शिराली गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कोळी समाजाला मोठा धक्का बसला आहे. तिथे शिंपले गोळा करणे हा पारंपरिक हंगामी व्यवसाय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिराली गावातील १४ लोक शिंपले गोळा करण्यासाठी नदीत उतरले होते. पाण्याचा अंदाज न घेता ते नदीच्या खोल भागात गेले असावेत.

दरम्यान, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला आणि महिलांसह संपूर्ण गट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला.

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

नागपुरात मैत्रीला काळीमा! ३ हजारांच्या उधारीपायी मित्रालाच संपवलं, दोघे अटकेत

Mumbai Ganesh Aagman 2026 : बाप्पाच्या आगमनाला सुरुवात! लालबाग-परळमध्ये जल्लोष; अनेक मूर्ती गुजरातकडे रवाना, VIDEO

आयटीमध्ये आता नवीन रोजगार नाही; AI आणि डेटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणूक होत आहे - श्रीधर वेम्बू

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध