राष्ट्रीय

मणिपूरमध्ये ३ जणांची हत्या

सुरक्षादलांनी आसपासच्या प्रदेशात शोधमोहीम सुरू केली असून गावच्या सुरक्षेत वाढ केली आहे

नवशक्ती Web Desk

इंफाळ : मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यातील थौवाई कुकी नावाच्या गावावर शुक्रवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला. हे गाव उखरुल सहरापासून ४७ किमी अंतरावर आहे. हल्लेखोर गावाच्या पूर्वेकडील डोंगरावरून आले आणि त्यांनी गावच्या रक्षकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात तीन जण जागीच ठार झाले. तिघेही मृत नागरिक कुकी समुदायाचे आहेत. हल्ल्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षादलांनी आसपासच्या प्रदेशात शोधमोहीम सुरू केली असून गावच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे