राष्ट्रीय

किरकोळ महागाईत किंचित घट

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर ६.८३ टक्के राहिला. यापूर्वी जुलैमध्ये तो ७.४४ टक्क्यांवर पोहोचला होता. भाज्यांचे दर घसरल्याने महागाई कमी झाली आहे. तथापि, हा दर अजूनही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ६ टक्केच्या वरच्या सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे आहे.

गेल्या महिन्यात शहरी महागाईचा दर ६.५९ टक्क्यांवर होता, जो जुलैमध्ये ७.२० टक्के होता. ग्रामीण भागातील महागाईचा दर ऑगस्टमध्ये ७.०२ टक्क्यांवर आहे, जो जुलैमध्ये ७.६३ टक्के होता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस