राष्ट्रीय

अबकी बार भाजप ४५० पार;त्रिपुरा मुख्यमंत्र्यांचा दावा

Swapnil S

आगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप देशभरात ४५० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा दावा केला आहे. पत्रकारांशी संवाद साधतांना रविवारी ते म्हणाले की भाजप यावेळी ४०४ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र माझ्या अंदाजानुसार यावेळी भाजप ४५०चा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. २०१९ निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या तर कॉंग्रेसला ५२ जागांवर समाधान मानावे लागले होते. राज्यात दोन लोकसभा जागा असून त्या मोठ्या फरकाने भाजप जिंकेल. त्यासाठीची तयारी सुरु करण्यात आली आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच राममंदिर प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून मंदिरांची स्वच्छता करावी असे आवाहन देखील त्यांनी राज्यातील जनतेला केली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस