राष्ट्रीय

लखनौ-गोरखपूर महामार्गावर अपघात ; सात जणांचा मृत्यू, 40 जण गंभीर

हा अपघात इतका भीषण होता की बसमधील काही प्रवासी बाहेर फेकले गेले, तर काही ट्रकखाली चिरडले गेले

नवशक्ती Web Desk

उत्तर प्रदेशातील अयोध्येतील लखनौ-गोरखपूर महामार्गावर एका खासगी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 40 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. दरम्यान, घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी रात्री अयोध्येहून येणाऱ्या एका खासगी बसने आंबेडकरनगरला जाण्यासाठी लखनौ-गोरखपूर महामार्गावर वळसा मारण्याचा प्रयत्न केला, असे एएनआयने वृत्त दिले आहे. मात्र, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की बसमधील काही प्रवासी बाहेर फेकले गेले, तर काही ट्रकखाली चिरडले गेले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने ट्रकखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या दुर्दैवी घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर लखनौ-गोरखपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

Mumbai : भांडुपमध्ये बांधकामस्थळी दुर्घटना; खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, ९ जण जखमी, VIDEO व्हायरल

Mumbai : स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याची गरज; मोटार अपघात दाव्यांसाठी उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना

५३व्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चाहत्यांसोबत खास सेलिब्रेशन; पाहा VIDEO

बेकायदा बेड्या ठोकल्याबद्दल प्रत्येकी ५० हजारांची भरपाई; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

Mumbai : नायरच्या MBBS विद्यार्थ्याला सावकारी दंड; साडेतीन लाखांचे वसतिगृह शुल्क भरले नाही, तर १९ लाखांचा दंड