(छायाचित्र - पीटीआय)
राष्ट्रीय

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी; भारताची MIRV तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या देशांच्या क्लबमध्ये एंट्री

Swapnil S

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सोमवारी ओदिशाच्या किनाऱ्यावरून अग्नी-५ या क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन 'मिशन दिव्यास्त्र' यशस्वी केले.

अग्नी-५चा पल्ला ५००० ते ८००० किलोमीटर असून त्यात 'मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एण्ट्री व्हेईकल' (MIRV ) तंत्रज्ञान वापरले आहे. त्याच्या वापरामुळे एकाच क्षेपणास्त्रावर २ ते १० पारंपरिक किंवा अणुबॉम्ब बसवून ते शत्रूच्या वेगवेगळ्या लक्ष्यांवर टाकण्याची क्षमता भारताने मिळवली आहे. सध्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या देशांकडेच हे तंत्रज्ञान आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस