राष्ट्रीय

एअर इंडियाचा व्यवसायाचे नवीन लक्ष; भारतातील ३० टक्के बाजारपेठ काबीज करण्याची योजना

वृत्तसंस्था

एअर इंडियाने येत्या पाच वर्षांसाठी आपल्या व्यवसायाचे लक्ष्य तयार केले आहे. येत्या पाच वर्षांत भारतातील ३० टक्के बाजारपेठ काबीज करण्याची योजना कंपनीने आखली आहे.

कंपनीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात आपला हिस्सा वाढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, देशातील बाजारपेठेत ही मोठा वाटा निर्माण करण्याचे कंपनीने ठरवले आहे. येत्या पाच वर्षांसाठी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांकडून सूचना मागवून आराखडा तयार केला आहे. ३० मोठी व लहान विमान ताफ्यात सामील करून घेतली जाणार आहेत. कंपनीने ‘विहान.एआय’ची घोषणा करताना सांगितले की, पाच वर्षांत कंपनीचे परिवर्तन केले जाणार आहे. नेटवर्क व ताफा यामध्ये मोठे बदल केले जातील. विश्वास, वक्तशीर विमानसेवा, तंत्रज्ञान आदींसाठी योजना आखली जाणार आहे. डीजीसीएच्या ताज्या आकडेवारीनुसार, कंपनीचा देशातील बाजारपेठेतील हिस्सा ८.४ टक्के आहे. कंपनी पाच क्षेत्रांवर काम करणार आहे. त्यात चांगला ग्राहक अनुभव, मजूबत संचालन, उद्योगाचे नेतृत्व व वाणिज्यिक दक्षता व नफा यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?