राष्ट्रीय

भारतात पहिल्यांदाच एअरबसचे ए-३५०-९०० विमान दाखल

एअर इंडियाचे ए-३५०-९०० विमानात तीन वर्ग आहेत. विमानात ३१६ जागा आहेत.

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळावर भारतात पहिल्यांदाच एअरबसचे ए-३५०-९०० विमान दाखल झाले. हे विमान एअर इंडियाचे आहे. हे नवीन विमान अत्याधुनिक असून एअर इंडियाच्या नवीन लोगोसह सजलेले आहे. मंगळवारसोडून हे विमान रोज चालवण्यात येणार आहे. सध्या हे विमान देशातंर्गत मार्गावर चालवले जाणार आहे. या विमानाद्वारे प्रवाशांचा चांगल्या प्रवासाचा आनंद मिळणार आहे.

सोमवारी हे विमान बंगळुरूहून सकाळी ७.०५ वाजता सुटले ते मुंबईला ८.५० वाजता पोहचले. हे विमान बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, मुंबई मार्गावर चालवले जाईल.

एअर इंडियाचे ए-३५०-९०० विमानात तीन वर्ग आहेत. विमानात ३१६ जागा आहेत. त्यात २८ खासगी बिझनेस सूट, २४ प्रीमीयम इकॉनॉमी सीट व २६२ इकॉनॉमी सीटस‌् असतील. या विमानात आधुनिक पॅनॉसॉनिक ईएक्स३ ही मनोरंजन सेवा, उच्च क्षमतेच्या स्क्रीन्स असतील. या विमानाला रोल्स रॉईल्स ट्रेंट एक्सडब्लूबी इंजिन आहे. या विमानात २० टक्के इंधनाची बचत होईल. तसेच कार्बन उर्त्सजन कमी होईल. एअर इंडियाला ए-३५०-९०० या जातीचे पहिले विमान मिळाले आहे. कंपनीने आणखी १९ विमाने घेण्याचे ठरवले आहे.

मुंबईत परतीच्या पावसावर चक्रीवादळाचं सावट! पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८व्या वेतन आयोगाच्या अटींना केंद्र सरकारची मंजूरी

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा पलटवार; हिकारू नाकामुराने केलेल्या अपमानाचा पटलावरच घेतला बदला

माज उतरला, माही खान वठणीवर आला! मनसेच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच "मुंबई मेरी जान...जय महाराष्ट्र" म्हणत मागितली माफी

पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत, IMW ला लावणार हजेरी; वाहतुकीत मोठे बदल - कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग?