राष्ट्रीय

भारतात पहिल्यांदाच एअरबसचे ए-३५०-९०० विमान दाखल

एअर इंडियाचे ए-३५०-९०० विमानात तीन वर्ग आहेत. विमानात ३१६ जागा आहेत.

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळावर भारतात पहिल्यांदाच एअरबसचे ए-३५०-९०० विमान दाखल झाले. हे विमान एअर इंडियाचे आहे. हे नवीन विमान अत्याधुनिक असून एअर इंडियाच्या नवीन लोगोसह सजलेले आहे. मंगळवारसोडून हे विमान रोज चालवण्यात येणार आहे. सध्या हे विमान देशातंर्गत मार्गावर चालवले जाणार आहे. या विमानाद्वारे प्रवाशांचा चांगल्या प्रवासाचा आनंद मिळणार आहे.

सोमवारी हे विमान बंगळुरूहून सकाळी ७.०५ वाजता सुटले ते मुंबईला ८.५० वाजता पोहचले. हे विमान बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, मुंबई मार्गावर चालवले जाईल.

एअर इंडियाचे ए-३५०-९०० विमानात तीन वर्ग आहेत. विमानात ३१६ जागा आहेत. त्यात २८ खासगी बिझनेस सूट, २४ प्रीमीयम इकॉनॉमी सीट व २६२ इकॉनॉमी सीटस‌् असतील. या विमानात आधुनिक पॅनॉसॉनिक ईएक्स३ ही मनोरंजन सेवा, उच्च क्षमतेच्या स्क्रीन्स असतील. या विमानाला रोल्स रॉईल्स ट्रेंट एक्सडब्लूबी इंजिन आहे. या विमानात २० टक्के इंधनाची बचत होईल. तसेच कार्बन उर्त्सजन कमी होईल. एअर इंडियाला ए-३५०-९०० या जातीचे पहिले विमान मिळाले आहे. कंपनीने आणखी १९ विमाने घेण्याचे ठरवले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 'अल्लाह हाफिज' व्हिडिओपासून ते मुंबईचा महापौर मराठीच होणारपर्यंत...युतीच्या घोषणेवेळी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

उद्धव ठाकरेंसोबत युती का? राज ठाकरेंनी पोस्ट करत सांगितलं नेमकं कारण

"घेरलं होतं मातोश्रीवरील 'विठ्ठलाला' बडव्यांनी.." उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या घोषणेनंतर आशिष शेलारांचा राज ठाकरेंना टोला

'ही' शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत...; संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा एल्गार

मोठी बातमी! महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती; राज-उद्धव दोघांकडूनही अधिकृत घोषणा; कोणत्या जिल्ह्यांत एकत्र लढणार?